सांगली महापालिका क्षेत्रातील डासांचा प्रादुर्भाव व दूषित पाण्याविषयी महापालीकेने गंभीर दखल घ्यावी : लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांची आयुक्तांकडे मागणी
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये दूषित, अळया मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .अनेक भागातील नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याचे दिसून येत आहे .शिवाय महापालिका क्षेत्रातील बहुतेक सर्वच ठिकाणी तुंबलेल्या गटारी ओपन स्पेस मध्ये तसेच मोकळ्या प्लॉटमध्ये सोडण्यात आलेले सांडपाणी यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू ,हिवताप सारख्या आजाराने नागरिक आणि लहान मुले आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही बाबींकडे महानगरपालिकेच्या आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांची भेट घेऊन,याबाबत गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान डास प्रतिरोधक धूर फवारणी करताना ती फक्त मुख्य रस्त्यावर न करता प्रत्येक गल्लीबोळात करण्यात यावी .स्वच्छता निरीक्षक मुकादम तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे .यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, सुनिल शिंदे, चेतन गाडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते .