प्रतिष्ठा न्यूज

छ.शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणा– प्रा.डाॅ.राष्ट्रपाल गायकवाड

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे कल्याणकारी राजे असून, आजच्या काळात त्यांचे विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. राष्ट्रपाल गायकवाड यांनी केले.
ते राजर्षी शाहू विद्यालय व जुनिअर कॉलेज वसंतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी. जयंती साजरी करीत असताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे हे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे, प्रा. गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्रा. राष्ट्रपाल गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी पुरुष नव्हते तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बहुजन समाजातील मावळ्यांना सोबत घेऊन शून्यातून स्वराज्य निर्माण केले. मोगलांकडून समाजातील गोरगरीब लोकावर होणारा अन्याय ,जुलूम नष्ट केला. आजच्या धकाधकीच्या काळात त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी समोर यावे असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले सर्वस्व संपले आहे अशी भावना ज्यावेळेस होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ही जगण्याची प्रेरणा देतात. ते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे त्याबद्दल मला आनंद वाटतो असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बी.एड. प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.