आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीत सोडा
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:यंदा पाऊसमान कमी झाला असून उन्हाळ्याच्या सुरुवाती पासूनच पाणी टंचाई जाणवू लागली असून नदी पात्र कोरडे पडत आहे,त्यामुळे आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीत सोडावे यासाठी तुरची,निमणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी तुरचीचे सरपंच विकास डावरे,उपसरपंच भाऊसाहेब खरात, निमणीचे माजी उपसरपंच आर.डी.पाटील,नेहरुनगरचे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील,बाळासाहेब पाटील, माजी सरपंच विजय पाटील,उदय पाटील,खंडु चौगुले आदी शेतकरी उपस्थित होते.यावेळी तहसीलदार यांनी सदर मागणीचे पत्र पुढील कार्यवाही साठी त्वरित जलसंपदा विभागाकडे पाठविले असल्याचे आर डी पाटील यांनी सांगितले.