प्रतिष्ठा न्यूज

पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या संजय काकांना निवडून द्या : राजेंद्रअण्णा देशमुख; दिघंची जिल्हा परिषद गटाची बैठक

प्रतिष्ठा न्यूज
आटपाडी प्रतिनिधी : टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणा असे आवाहन माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ दिघंची जिल्हा परिषद गटातील मोजक्याच कार्यकर्त्यांची आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे बैठक झाली. या बैठकीत राजेंद्रअण्णा देशमुख बोलत होते. सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आवळाईचे लोकनियुक्त सरपंच गजेंद्र श्रीमंत पिसे यांच्या घरी ही बैठक झाली.
राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, आटपाडी हा कायम दुष्काळ तालुका होता परंतु महायुती सरकारच्या माध्यमातून या भागात टेंभू जलसिंचन योजना अतिशय वेगाने राबवण्यात आली आणि तालुक्यातील शिवारामध्ये पाणी आलं. शेतं हिरवीगार झाली आहेत. या तालुक्यात हरितक्रांती करणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचे नाव मोठं होत आहे. देशाची प्रगती होत आहे अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने आपण विजय केले पाहिजे असे आवाहन राजेंद्रअण्णा देशमुख यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.