सिराज शिकलगार यांना २५ वा पुरस्कार जाहीर
प्रतिष्ठा न्यूज
सांगली ( प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील, “दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने लोक कलावंत पै.मजनू भाई शेख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त “राज्यस्तरीय उत्कृष्ट गझल लेखन पुरस्कार” यंदा सांगली जिल्ह्यातील आंधळी येथील सुप्रसिद्ध गझलकार श्री.सिराज शिकलगार यांच्या “गझलछाया” या गझलसंग्रहास जाहीर झाला आहे. रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी श्रीरामपूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. नुकतेच दोस्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ कवी रज्जाकभाई शेख यांनी या आशयाचे निवडपत्र देऊन श्री.सिराज शिकलगार यांना कळविले आहे.
श्री.सिराज शिकलगार यांची आजपर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी ८ पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्यांनी आजवर १३ प्रकाशित गझलसंग्रहाच्या माध्यमातून १००० गझल लेखनाचा महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. त्याना आजवर २४ पुरस्कार मिळाले असून हा २५ वा पुरस्कार आहे.