कंधार तालुक्यातील पेठवडज कवठा परिसरात अवकाळी पावसामुळे गारपीट झाल्याने शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान
प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.17 : कंधार तालुक्यातील पेठवडज , कवठा सर्कल मधील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे काल दि.16 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गारपीट झाल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील पेठवडज ,शिरशी खुर्द, शिरसी बुद्रुक, जाकापूर, रहाटी, येलूर,मादाळी, नारनाळी ,मंगनाळी, कळका वरवंट ,शिरूर, शिरुर चौकी. तेलूर . धानोरा, काटकळंबा, बारूळ आदी गावातील शेतीतील पिकांचे गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतीतील गहू ,हरभरा , सोयाबीन ,हळद , ज्वारी, करडई, फुले आणि भाजीपाला इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या परिसरातील कवठा, बारुळ सर्कल मधील अनेक गावात गारा पडल्याने हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर आणि आंबे गळून गेले आहेत.
तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.