कुंडलमध्ये ९ मे रोजी होणार निखिल वागळे यांचा “निर्भय बनो” चा एल्गार : ॲड दिपक लाड
प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : ग्रेट पत्रकार निखिल वागळे यांची क्रांतीनगरी कुंडल येथील दिनांक ९ मे सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या क्रांतिकारी सभेची तयारी अंतिम अंतिम टप्प्यात आली असल्याचे रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड दिपक लाड यांनी सांगितले.
अलीकडच्या संकुचित आणि रोगट मानसिकता बाळगणाऱ्या काळामध्ये निखिलजी वागळे यांची पत्रकारिता लखलखून उठणारी आहे .
निर्भिड, विवेकी आणि बुलंद आवाजाने महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेची आणि वारशाची नेमकी बूज राखत मुक्तिदायी परिवर्तनाचा मार्ग अधिक प्रशस्त करत नेलेला आहे.
हा आवाज असाच बुलंद रहावा !
यासाठी सामान्य माणसांचा आतला आवाज शोधला जावा , तो आवाज समाजापुढे मांडला जावा, आजचे स्वातंत्र्य खरच गरिबांच्या चुलीपर्यंत पोहोचले का? सर्वसामान्य लोक आपल्या दुःखावर बोलत आहेत का,
त्यांना बोलायची संधी दिली जाते का ? या आणि अशा अनेक ज्वलंत संवेदनशील प्रश्नावर कुंडल येथे जागतिक कीर्तीचे पत्रकार पत्रकारितेतील धगधगता अंगार ग्रेट पत्रकार निखिल वागळे आवाज उठवणार आहेत .
कुंडल येथे दिनांक 9 मे सायंकाळी 7 वाजता जाहीर क्रांतिकारी सभा आयोजित केली आहे त्या सभेबाबत नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात असून सांगली जिल्हासह कोल्हापूर सातारा व परिसरातून हजारो लोक वादळी सभेस येणार असल्याचे तसेच ही सभा “न भूतो भविष्यती” समाज प्रबोधनपर परिवर्तनवादी होणार असल्याचे रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड दिपक लाड यांनी कळवले.