आता तासगावकरांना खाऊगल्ली’त असंख्य रुचकर आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहराचा विकास होत असताना वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन होणे गरजेचे असून शहरातील विविध ठिकाणच्या विक्रेत्यांसाठी आठवडे बाजार,भाजी मार्केट,खाऊ गल्ली,अशी विविध विक्री केंद्र होणे गरजेचे असते.त्याच अनुषंगाने तासगाव पालिकेने दत्तमाळावर खाऊ गल्ली उभी केली असून आता या खाऊ गल्लीत खाद्य प्रेमिना निवांत बसून खाण्याचा आनंद घेता येणार आहे.शहर वासियांना या खाऊ गल्लीत असंख्य रुचकर आणि चविष्ट खाद्य पदार्थांचा आस्वाद एकाच छताखाली घेता येणार आहे.तासगाव पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मिळालेल्या दोन कोटी रुपये निधीतून लहान मुलासाठी बाल उद्यान व खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे.भूमी पूजन झाल्यानंतर एक वर्षात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठपुराव्याने बाल उद्यान आणि खाऊ गल्ली शहर वासियांना खुली करण्यात आली आहे.काही दिवसां पूर्वी खाऊ गल्लीतील गाळ्यांचा लिलाव होऊन गाळे वाटप करण्यात आले होते, कालपासून अनेक विक्रेत्यांनी दुकानें सुरु केली असून खाद्य प्रेमिनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.