प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकांचा सत्यशोधक भूमिकेचा आग्रह पुन्हा नवसमाज निर्मितीकडे वाटचाल करणारा – डॉ. श्रीपाल सबनीस

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षकांनी सत्य स्वीकारले पाहिजे, जपले पाहिजे, वृद्धिंगत केले पाहिजे, त्यांच्या ह्या सत्यशोधक भूमिकेचा आग्रह पुन्हा एकदा नव्या समाज निर्मितीकडे वाटचाल करणारा असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले. निर्मिती विचारमंच आणि प्रागतिक लेखक संघ यांच्यावतीने आज कोल्हापूर येथे झालेल्या डॉ. खंडेराव शिंदे लिखित पकाल्या आणि शकुंतला शिंदे लिखित संघर्ष या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेखान शाणेदिवान हे होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आजच्या काळात फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे लोक धाडसी म्हटले पाहिजेत, अशाही काळात हा संपन्न वैचारिक आणि कृतिशील वारसा पुढे नेणाऱ्या कोल्हापूरच्या या लोकांचे मला विशेष कौतुक करू वाटते. फुलेनी फक्त जातीचे नव्हे तर वागण्यातील ब्राम्हण्य सुद्धा नाकारले, जसे महात्मा फुले ना महात्मा म्हंटले जाते तसेच सावित्रीबाई यांनाही महात्मा म्हणणे उचित ठरेल.
अध्यक्षस्थानी बोलताना, डॉ. राजेखान शाणेदिवान म्हणले की, क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनामित्त होणारा हा प्रकाशन सोहळा आणि राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा हा दुर्मिळ आणि तितकाच महत्वाचा क्षण आहे.
यावेळी सुदर्शन शिंदे (उस्मानाबाद), डॉ. सारिका केदार (परभणी), विभावरी मेश्राम (कल्याण), सुवर्णा सुतार, भरत चौगले, कुसुम राजमाने, शंकर पुजारी, समीर शेख, योगेश साबळे, सुनंदा बागे, पांडुरंग देशमुख, शरद पाडळकर, रेखा दीक्षित (कोल्हापूर), प्रा. डॉ. मिना सुर्वे, प्रा. डॉ. श्रीधर शिंदे, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, डॉ. सूरज चौगुले, डॉ. भरत जाधव, डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. अर्जुन पन्हाळे, अस्मिता पवार, शिवाजी माळी (सांगली), डॉ. किरण जगदाळे, डॉ. दत्तात्रय काळेल, डॉ. जितेंद्र जळकुटे, सविता सुकाळे (सोलापूर), छाया पाटील, डॉ. राजेन्द्र ननावरे (मुंबई), डॉ. राजेंद्र गायकवाड (पुणे), डॉ. सागर सानप, संभू कोकाटे (ठाणे), प्रा. माधव आग्री (पालघर), प्राचार्य डॉ. सुरेश कुराडे (सिंधुदुर्ग), सोपान भोईर, संजय पवार, महेंद्र पगारे, बाळूकाका शेवाळे (नाशिक), डॉ. आत्माराम झिंजर्डे, डॉ. हरिदास विधाते (बीड), प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (बेळगाव), डॉ. संजय वाघंबर (लातूर), विठ्ठल गोंडे, भास्कर बावनकर (चंद्रपूर), क्रांती भोसले (रायगड), के. एस. शिंदे, आराधना गुरव (सातारा), शंकर अंदानी, सुनंदा दहातोंडे (अहमदनगर), प्रा. अनिल भुरके दर्यापूर (आमरावती), प्रा. डॉ. गोकुळ बोरसे (जळगाव), बाबासाहेब कांबळे (रत्नागिरी) या 54 मान्यवरांना कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके देऊन यावेळी प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच यांच्या वतीने राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देऊन डॉ. श्रीपाल सबनीस व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. सुरेशराव जाधव, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य प्रशांतकुमार कांबळे, सूरज वाघमारे, डॉ. अवनिश पाटील, विजया कांबळे, डॉ. शोभा चाळके, प्रा. मिनल राजहंस, डॉ. दयानंद ठाणेकर, ॲड. करुणा विमल, चंद्रकांत सावंत, डॉ. स्वप्नील बुचडे, मोहन मिणचेकर, अमित मेधावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्वागत रंजना सानप यांनी केले, प्रास्तावीक अनिल म्हमाने यांनी केले. आभार डॉ. नंदकुमार गोंधळी मानले व सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.