प्रतिष्ठा न्यूज

तासगावात राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त स्वराज्य पक्षाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळ्याच्या निमित्ताने स्वराज्य पक्ष सांगली जिल्हाच्या वतीने दि.०२/०७/२०२३ रोजी पंचायत समिती हाॅल तासगाव येथे शालेय पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या,यामध्ये एकुण दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनीनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे संयोजन स्वराज्य पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.अमोल कदम व मा.प्रमोद पाटील यांनी केले होते.यामध्ये प्रथम क्रमांक  कु.तनया तुषार शेट्टी,द्वितीय क्रमांक कु.आरोही संजय भंडारे,
तृतीय क्रमांक श्लोक संजय माने व उत्तेजनार्थ कु.अवनी मल्हारी पाटील यानी पटकावला,त्यांना शिल्ड, प्रशस्तीपत्र,आणि बक्षीसाची रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सहभागी सर्वच स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून मा.आनंदा गेजगे,मा.पत्रकार विक्रांत पाटील व मा प्रकाश कांबळे सर यांनी काम पाहिले,आलेल्या मान्यवरांचे स्वागत जेष्ठ पत्रकार  शशिकांत डांगे यांनी केले तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे सरानी केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पलूस चे शिक्षण विस्तार अधिकारी मा: प्रकाश कांबळे सर व तुरची गावचे आदर्श सरपंच मा:विकास ( भाऊ) डावरे, स्वराज्य पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष मा दिपक मुळीक, मा. बापुसो क्षिरसागर, अॅड.संजय धर्माधिकारी,आशिष मुळीक,मा: लक्ष्मण भाऊ मडले,शहाजी जाधव, अब्दुल मुलाणी,धनाजी मदने,
अभिजित कदम,प्रथमेश पाटील, दशरथ मोरे,भरत (नाना) थोरात,प्रसाद वारे,अक्षय शिंदे, विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते
तर आभार पत्रकार विक्रांत पाटील यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.