प्रतिष्ठा न्यूज

रांजणीची शेळी समूह योजना शासनाकडून रद्द.. राजकीय आकसापोटी योजना रद्द केली. रोहित पाटील यांचा आरोप..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाविकास आघाडी सरकार असताना रांजणी येथे शेळी समूह योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली होती.सरकारकडून सदर योजना रांजणी ता.कवठेमहांकाळ येथील रद्द करून दहिवडी जि.सातारा येथे हलवण्यात आली आहे.सातारा जिल्ह्याला नवीन प्रकल्प व तरतूद देण्याऐवजी शिल्लक राहिलेला निधी देणे हे तेथील शेतकरी बांधवांवर होणारा अन्याय आहे.सदर योजनेसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.सदर योजना  शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घेतली असताना आता मात्र राजकीय आकसापोटी ही योजना कवठेमहांकाळ तालुक्यातून रद्द करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचें युवानेते रोहित पाटील यांनी केला असून,तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ येत्या काळात या अन्यायाला हद्दपार करेल असे म्हंटले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.