राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने तासगावच्या 51 होतकरु तरुणांनी एकत्र येवून केले रक्तदान
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे.अनेक ठिकाणी अपघात अथवा मोठ्या शस्त्रक्रियांवेळी रक्ताची कमतरता भासू लागली आहे.याची माहिती मिळताच तासगावातील गरीब घरातील होतकरु तरुण एकत्र आले, आणि बघता बघता तब्बल 51 जणांनी रक्तदान केले.तासगावमधील श्री गणेश चालक मालक संघटनेने हा उपक्रम राबवला.कोणाचा वाढदिवस नाही,जयंती नाही,पुण्यतिथी नाही की कसला कार्यक्रम नाही राज्यात रक्ताचा तुटवडा आहे,हे समजल्यानंतर या तरुणांनी एकत्र येवून विचार केला आणि सांगली येथील आदर्श रक्तपेढीला रक्तपुरवठा करण्यात आला.दरम्यान या तरुणांनी यापूर्वीही पुरपरिस्थिती, कोरोना काळात सामाजिक जबाबदारी पाळून अनेकांनी मदत केली आहे.