खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वारणा धरणामधील दोन टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त भागाला मिळणार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सद्यस्थितीत कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये व वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्र मध्ये तुलनात्मक कमी पाऊस पर्जन्यमान असल्याने तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान कमी असल्याने मुक्त पाणलोट क्षेत्राचे पाणी नदीमध्ये पुरेशा प्रमाणात नाही जास्त सद्यस्थितीत आपण योजना चालू शकत नव्हतो आता सध्या स्थितीत वारणा धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा फक्त सात टीएमसी असून त्यासाठी असून त्यातील काही पाणी जत सारख्या अत्यंत दुष्काळग्रस्त भागात व सद्यस्थितीत टंचाईच्या सर्वात जास्त तालुक्यात देण्यासाठी माननीय खासदार संजय काका पाटील यांनी शासन दरबारी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वारणाधरणातील दोन टीएमसी पाणी दीड ते दोन महिन्यासाठी टंचाई कालावधीत फक्त जत तालुक्यातील पाठपुरावा केला तसेच यासाठी इतर वरिष्ठ अधिकारी कार्यकारी संचालक अतुल कपोले साहेब व इतर सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब कोल्हापूर जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता सुर्वे साहेब अशा क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडे प्रचंड पाठपुरावा करून त्यांनी पाणी सोडण्यास मंजुरी मिळाली आहे दोन ते तीन दिवसात योजना सुरू होऊन जत कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे सदरचे पाणी सुटल्यामुळे अत्यंत दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात पाणी मिळाल्याने दिलासा मिळणार आहे.