सांगलीचा कायापालट केल्याने संजयकाका पाटील यांचा विजय निश्चित : निजीनजी गडकरी; मिरजेत विकसित भारत @ २०४७ संवाद सभा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याचा कायापालट केल्यामुळे जनतेचा विकासकामांवर विश्वास आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने संजयकाका पाटील यांचा विजय निश्तिच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था तिसर्या क्रमांकावर आणून भारताला विश्वगुरू बनवायचे आहे. त्यामुळे जनता निश्चितपणे भाजपाला साथ देईल. असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले.
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याचा कायापालट केल्यामुळे जनतेचा विकासकामांवर विश्वास आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने संजयकाका पाटील यांचा विजय निश्तिच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था तिसर्या क्रमांकावर आणून भारताला विश्वगुरू बनवायचे आहे. त्यामुळे जनता निश्चितपणे भाजपाला साथ देईल. असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले.
सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ विकसित भारत@२०४७ या विषयावरील संवाद कार्यक्रमात नितीनजी गडकरी बोलत होते. मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.
उमेदवार संजयकाका पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री दिपकबाबा शिंदे – म्हैसाळकर, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे, माजी आमदार रमेश शेंडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पादाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीनजी गडकरी म्हणाले, कॉंग्रेसच्या काळात देशाची परिस्थिती भयानक होती. नियोजनात्मक विकास नव्हता. शाळा आहेत तर विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी आहेत तर शाळा नाहीत अशी शिक्षणाची स्थिती होती. दवाखाने नव्हते. सुविधा नव्हत्या. डॉक्टर नव्हते. आरोग्याच्या समस्या गंभीर होत्या. ग्रामीण भागात जनावरांचे ही डॉक्टर मिळत नव्हते. त्यामुळे शेतकर्यांना पशुधनावर उपचार करणे अवघड होते. कॉंग्रेसने शेतकर्यांडेक आणि शेतीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे जल सिंचनाच्या योजना रखडल्या होत्या. रस्ते नव्हते. अशा परिस्थीत २०१४ ला जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. तेव्हा जलसिंचन, रस्ते आणि पायाभुत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. स्वदेशी आणि स्वावलंबन या तत्वानुसार नियोजनात्मक विकास केला. जलसिंचन योजना गतीने राबविल्यामुळे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात हरितक्रांती झाली आहे. मी जेव्हा हेलीकॉप्टरमधून आलो तेव्हा याभागातली हिरवाई पाहून मला खूप आनंद झाला. सगळीकडे पाणी पोहचलं आहे. मी जल संपदा मंत्री असताना बळीराजा संजीवन योजनेतून ९ हजार कोटी आणि प्रधानमंत्री कृषी संजीवन योजनेतून ११ हजार कोटी रूपये जलसिंचना करीता दिले होते. त्यामुळे लाखो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. शेतकरी समृध्द झाला आहे. रोजगार निर्माण झाला आहे. रस्त्यांसाठी लागणारी माती गोळा करत असताना अनेक गावांमध्ये तलाव खोदले. बुलढाणा अजिंठा रस्त्यावर पाणक्ष नव्हते. त्यामुळे काही महिने तिथले लोक स्थलांतर करायचे. आता पाणी आल्यावर तो भाग समृध्द झाला. स्थलांतर थांबले. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्या. जल, जमीन आणि जनावरे ही शेतकर्यांची खरी संपत्ती आहे. आपल्या भागातल्या जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांमध्ये जल सिंचन योजनांमुळे अमुलाग्र बदल झाला आहे. हे चित्र कसं बदललं ते तुम्हाला माहित आहे. अधिक समृध्द होण्याकरीता शेतकर्यांनी भविष्यात हायड्रोजन निर्मितीकडे वळले पाहिजे. स्वप्न दाखविणारे नेते लोकांना आवडतात परंतु जर ती पूर्ण केली नाहीत तर लोक त्यांना उखडून टाकतात. आणि पूर्ण केली तर डोक्यावर घेतात. ज्यांच्या आपल्या कर्तृत्वावर विश्वास नसतो त्यांच्या डोक्यावर जातीयवादाचं भूत बसलेला असतं. भांडण लावून मत मिळविण्याचा ते प्रयत्न करतात.
नितीन गडकरी म्हणाले, गरीबी दूर करणारा, सामान्या माणसाचा सुखांक पूर्ण करणारा नेता, पक्ष सत्तेत आला पाहिजे. तरच माणूस सुखी होईल. आपण रस्ते केले त्यामुळे अनेक शहरांकडे जाण्यासाठी लागणारा वेळ कमी झालाा आहे. गरींबांचे जीवन सुसह्य करणारा, गरीबांचे कल्याण करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू व्हायचा असेल तर संजयकाका पाटील यांना निवडून द्या. १८ वे शतक मुघलांचे होते. १९ शतक इंग्रजांचे होते. २० व्या शतकात अमेरीका सुपर पॉवर झाला. तर २१ शतक हे भारताचं आहे. विश्वगुरू होण्याचं आहे. शेती उद्योग, निर्यात यावर भर दिला गेला आहे. २५ कोटी लोकांना गरीबीच्या रेषेच्या वर आणले आहे. समाजवादी पार्टी संपली. स्वतंत्र पार्टी संपली. भंगार अर्थव्यस्था देणारी कॉंग्रेस पार्टी संपली. आता गाव, गरीब आणि शेतकर्यांचं जीवन सुखी करणारी विकसनशिल भारताची संकल्पना असणारी भाजपा आली आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करून समतोल साधण्यासाठी योग्य नेतृत्व, योग्य पार्टी सत्तेत येणं गरजेचं असतं. संजयकाकांच्या रूपानं एक चांगलं उमेदवार मिळाला आहे.
संजयकाकांच्या २०० चकरा
सांगली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे २०० चकरा मारल्या आहेत. दुष्काळी भागात पाणी गेलं याचं श्रेय संजयकाकांनाच द्यावं लागेल. नरेंद्र मोदींना द्याव लागेल. आणि आमचं सरकार निवडून आणलं म्हणून जनतेला द्यावं लागेल. यापुढच्या काळात अशीच विकासाची कामे करण्यासाठी संजयकाकांना निवडून द्या.
मोदींचा सैनिक म्हणून संधी द्या : संजयकाका
गेल्या दहा वर्षात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. लवकरच जिल्हा दुष्काळमुक्त होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मतदानरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या. असे आवाहन खासदार संजयकाका यांनी केले.