आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्यांच्या पगारातून ३० टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी देण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा परिषदेने करावा : ज्येष्ठ पत्रकार तुकाराम पडवळ यांची मागणी
प्रतिष्ठा न्यूज
गगनबावडा प्रतिनिधी : आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्यांच्या पगारातून ३० टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी देण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा परिषदेने करावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तुकाराम पडवळ यांनी पत्राद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की,
शासकीय / नेहमी शासकीय नोकरदार असूनही अनेकजण वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. अनेकजण सांभाळही करीत नाहीत. यावर पर्याय म्हणून अहमदनगर, लातूर व सांगली जिल्हा परिषदेने ठरावच सर्वसाधारण सभेत घेतला आहे. जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्याच्या पगारातून ३० टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी मिळणार आहे. या ठरावाचे कौतुक होत आहे. हा ठराव आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेची व्हावा असे मला वाटते.
आई-वडिलांनी पालन-पोषण केल्यानंतरच मुले सक्षम होतात. पण त्यांच्या वृद्धपकाळात मुलांना आई-वडिलांच्या कष्टचा विसर पडतो. अनेकांना नीटनेटकी वागणूकही मिळत नाही. परिणामी मुलगा नोकरदार असताना त्यांना वृद्धपकाळात आश्रमात किंवा वाईट परिस्थितीत दिवस काढावे लागतात. यावर जालीम पर्याय म्हणून अहमदनगर,लातूर व सांगली जिल्हा परिषदेने एक ठराव मंजूर केला आहे. जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही त्यांच्या पगारातील ३० टक्के रक्कम ही थेट वडिलांच्या खात्यावर थेट जमा होईल. असा ठराव मंजूर होऊ शकतो आणि त्यास कायद्यात तसा अधिकार असल्याचे सांगितले आहे. असच ठराव आपल्या जिल्हा परिषद मध्ये करावा ही माझी विनंती आहे.
तुकाराम पडवळ
मोबाईल नंबर 8208501297