गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नऊ घरांचे दोन लाखांचे नुकसान ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर पडले
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.10 : गगनबावडा तालुक्यात या चार-पाच दिवसात वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने जवळजवळ नऊ घरांचे अंशतः भिंती कोसळून, पत्रे उडून दोन लाखांचे नुकसान होऊन ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर पडले.
यामध्ये गगनबावडा मधील गंगाराम बाबू कोळेकर यांचे घराची भिंत कोसळून 20 हजाराचे नुकसान झाले. रेव्याची वाडी येथील आक्काताई तुकाराम चौकेकर यांचे घराची भिंत कोसळून पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले. तर गगनबावडा येथील विनोद सदाशिव पांगळे यांचे घराचे पत्रे उडून वीस हजाराचे नुकसान झाले. अन्य साखरी तील तीन घरांचे, साळवण मधील एका घराचे, असून असंडोली तील एका घराचे व शेळोशीतील एका घराचे असे सर्व मिळून दोन लाखाच्या आसपास नुकसान झालेले आहे.
शासनाकडून पंचनामे चालू आहेत. त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी. अशी नागरिकांची मागणी आहे.