तासगाव तालुक्यात लहान मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचे आवाहन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सध्या तासगाव तालुक्यात सोशल मीडियावर लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची अफ़वा पसरली आहे.मात्र ही केवळ एक अफवाच असून,अशा प्रकारची मुले पळवलेली कोणतीही घटना तासगाव तालुक्यात कुठेही घडलेली नाही.त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन पोलिस निरीक्षक संजीव झाडें यांनी केले आहे.सध्या सणासुदीचे दिवस असल्याने 24 तास गस्त सुरू आहे.त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे ही अफवा आहे,अशा अफ़वा विनाकारण कोणीही पसरवू नयेत, जर कोणी जाणीवपूर्वक अशा अफ़वा पसरवत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्या वर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल,तसेच या अफवांची पोलिसांनी शहानिशा व सखोल चौकशी केले आहे.त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,तसेच याबाबत काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी केले आहे.