मोदी सरकारने ओबीसींना न्याय दिला आता आम्ही संजयकाकांना मते देणार : ओबीसी नेत्यांचा निर्धार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ओबीसींच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या. ओबीसींना न्याय देणारे एकमेव भाजपा सरकार आहे. केंद्र सरकारने ओबीसींना न्याय दिला आता आपण खासदार संजयकाका यांना मते देणार असा निर्धार ओबीसी नेत्यांनी सांगली येथे ओबीसी मोर्चाच्या बैठकीत केला. या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ नेते दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुनील वाघमोडे, माजी महापौर संगिता खोत, गणेश वाठारकर, राज पडळकर, वरद पडळकर, विश्वनाथ महाजन, प्रसाद वळकुंडे, भानुदास सरगर, महेश मजगे, उदय वलकर, चंद्रकांत पंडित, वैशाली शेळके, शितल सिंहासने, सविता मदने उपस्थित होते.
विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर ओबीसींना आत्मनिर्भर करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यामुळे ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण ओबीसी समाज मोदीजींच्या मागे उभा करून पुन्हा एकदा केंद्रात भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी संपूर्ण शक्ती प्रणाला लावू. येत्या निवडणुकीत मोदींनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम, राम मंदिर, काश्मीर प्रश्न, कलम 370, तीन तलाक, जवानांचे सक्षमीकरण व शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेल्या योजना समाजातल्या खालच्या पातळीवर केलेले काम, याची माहिती समाजात या योजनेची माहिती करुण देण्यासाठी सर्वांनी निवडणुकीत सक्रीय सहभागी राहून आपल्या भागात बुथ मजबुत करून त्या भागातील जास्तीत जास्त मतदान मिळवावे यासाठी ओबीसी मोर्चा प्रचारात सर्वात पुढे राहील असा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.