तासगावात वादळी वाऱ्याने अनेक घरांचे प्रचंड नुकसान : शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहर आणि परिसरात काल वादळी वाऱ्यासह दीड तास मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळी वाऱ्याने अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले असून पडलेल्या घरांचे आज पंचनामे करण्यात आले असून प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारीं प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.शहरातील जगदीश पेटकर,महादेव अडसूळ,अरुण पेटकर,सचिन रामचंद्र जाधव,बाळू देवकुळे,अजय डिसले तसेच गोटेवाडी रोडवरील एका घराचे पत्रे उडून गेले आहेत.यातील अनेक घर जमीन दोस्त झाली असून,यात घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.पंचनामे केलेल्या घरांचे तसेच अवकाळी पावसाने शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे सुद्धा पंचनामे करून लवकरात लवकर शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष संदीप सावंत यांनी केली आहे.