प्रतिष्ठा न्यूज

८३ झोपडपट्टीतील रहिवाशांना सातबारा देण्याच्या मागणीसाठी उत्तमआबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेवर आक्रोश मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : झोपडपट्टी संघर्ष कृती समिती गेली वीस वर्षे झोपडपट्टी धारकांच्या विविध प्रश्नावर लढा देत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णयाची अंमलबजावणी करून महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या रहस्यांची मालकी हक्काची नोंद करून सातबारा व सिटी सर्व्हे ला नावे लावण्यात यावीत या मागणीसाठी सांगलीतील झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने सांगली महापालिकेवर महिला व पुरुष यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व झोपडपट्टी संघर्ष समितीचे अध्यक्ष उत्तमआबा कांबळे यांनी केले.

यावेळी झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने महापालिका प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे. जर महापालिकेने झोपडपट्टीतील रहिवाशांची मालकी हक्काची नोंद करून सातबारावर नावे लावली नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा उत्तम आबा कांबळे यांनी दिला. महापालिका क्षेत्रातील ८३ झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांच्या नावावर  सातबारा उतारा मिळाला पाहिजे. आठ दिवसांत जर सातबारा मिळाला नाही तर सर्व झोपडपट्टीतील रहिवाशांना घेऊन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात सर्वत्र चक्का जाम आंदोलन करू असा इशारा उत्तम कांबळे यांनी दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.