प्रतिष्ठा न्यूज

तासगावचा श्रींचा रथोत्सव यावर्षी 1 सप्टेंबरला मोठ्या उत्साहात साजरा होणार : २४३ व्या वार्षिक भाद्रपद गणेशोत्सवास प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार 
तासगाव : प्रतिवर्षीप्रमाणे श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपर्यंत गणपती पंचायतन मधील पाचही देवतांच्या अनुष्ठानांना आज पासून प्रारंभ झाला. परंपरे नुसार आज सोमवारी श्री गणपती मंदिरामध्ये उत्सवाच्या वातावरण निर्मिती व प्रसन्नतेला हातभार लावणाऱ्या अनुष्ठानवाहनाची व पुण्याहवाचनाची पूजा विधी पटवर्धन सरकार यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाली.प्रमुख पौरोहित्य पंडित अनंतशास्त्री जोशी यांनी केले,यांच्यासह पंडित दीपक पांडुरंग जोशी,पंडित अथर्व आनंद जोशी,पंडित अजित कुलकर्णी,पंडित विजय कुलकर्णी यांना विविध देव-देवतांच्या मंत्र पटनाची सुपारी देण्यात आली.सर्व गुरुजींना अनुष्ठानाच्या सुपाऱ्या देण्यात आल्या.संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उत्सव म्हणजे तासगावचा रथोत्सव.आज रथगृहात रथ पुजन करून रथाची डागडुजी व रंगकामासाठी रथ बाहेर काढण्यात आला.मागील वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव रद्द करण्यात आला होता.मात्र ह्यावर्षी परिस्थिती सर्वत्र आलबेल आहे.आज सकाळी अनुष्ठान सुपारी देण्याच्या कार्यक्रमानंतर रथपूजन करून रथ बाहेर काढण्यात आला.या वेळी गणपती पंचायतन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मा.राजेंद्र पटवर्धन सरकार,देवस्थानचे जनरल मॅनेजर पवन सिंह कुडमाल,सर्व पुजारी,  रथाचे गती व दिशा दिग्दर्शनाचे मानकरी श्री रंगराव धोत्रे,श्री संतोष धोत्रे,दत्ता जाधव,राहुल चव्हाण,  सुरज पाटील,अक्षय शिंदे,गिरीश पाटील,सोनू यादव,बापू कृष्णा पवार,  सचिन पवार,वैभव पवार,अजय खिचडे,अजय राजाराम चव्हाण,  प्रतीक पाटील,प्रेम पाटील,ओम काकडे आदी मानकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री राजेन्द्र पटवर्धन म्हणाले श्रींचा रथोत्सव आनंदात साजरा होत असताना गतवर्षी घडलेल्या अधर्म व अनीती ग्रस्त घटनांच्या आठवणी रथाच्या चक्रा खाली नष्ट करण्याचे हि कार्य तो रथ करीत असतो.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.