प्रतिष्ठा न्यूज

शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा; ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ : पत्रकार परिषद !

प्रतिष्ठा न्यूज 
पणजी प्रतिनिधी :  आज सर्वत्रचे चित्र पाहिल्यास ‘थूक जिहाद’, ‘गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपापासूनचे पदार्थखवापेढा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेतभाविक भक्तीभावाने देवाला ते अर्पण करतातहा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवरील मोठा आघात आहेआज अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहिंदू दुकानदारांची प्रसादाचीपूजासाहित्यांची दुकाने असतातत्यांच्याकडील प्रसाद आणि साहित्य शुद्ध अन् पवित्र असेलअसे सांगता येत नाहीबाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतोयाची माहिती नसतेत्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करणे चालू झाले आहेहिंदु दुकानदारांना ‘ओम प्रमाणपत्र’ विनामूल्य दिले जाणार आहेतदेशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ अवश्य घ्यावेअशी मी विनंती करत आहेअसे आवाहन तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्रीटीराजासिंह यांनी केलेते गोवा येथील चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने पणजीगोवा येथील ‘झेड स्क्वेर बॅक्वेट हॉल’मधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

    या वेळी पत्रकार परिषदेला येथील ‘काशीमथुराभोजशालाकिष्किन्धा’ आदी प्रमुख हिंदु मंदिरांचा खटला लढवणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे आणि ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे राज्य सचिव श्रीजयेश थळी हे उपस्थित होते.

    या वेळी श्रीरमेश शिंदे म्हणाले कीमुसलमानांच्या आग्रहामुळे देशात ‘हलाल’ सर्टिफिकेट सर्वच उत्पादनांना बंधनकारक केले जात आहेहिंदूंनाही हलाल प्रमाणित उत्पादने घ्यावी लागत आहेततामिळनाडूतील मंदिरांत हलाल प्रमाणित पदार्थ विकले जात होतेहिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर हे अतिक्रमण आहेदेवाला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा शुद्ध आणि सात्त्विक असला पाहिजेधर्माचरण करणार्‍या हिंदूंचा हा अधिकार आहेहिंदूंना शुद्ध आणि चांगल्या दर्ज्याचा प्रसाद मिळण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्रीरणजीत सावरकर यांच्या ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने ‘ओम प्रमाणपत्र (सर्टिफिकेटचालू करण्यात आले आहेमहाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरातील १०० प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम सर्टिफिकेट’ देण्यात आले आहेतसेच हे प्रमाणपत्र देशभरातील मंदिर परिसरातील दुकानदारांसाठी चालू करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

भारत सरकारची भूमी वक्फला देणे हे बेकायदेशीर असल्याने वक्फ बोर्ड बरखास्त करा !

    या वेळी दिल्ली येथील सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु जैन म्हणाले कीहिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेतमात्र पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे ही मंदिरे जीर्ण झालेली आहेत्यांचा कुठलाही जीर्णाेद्धार केला जात नसल्यामुळे ती मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेतखरे तर ही मंदिरे हिंदूंचा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांची योग्य देखभाल आणि जीर्णाेद्धार केला पाहिजेअशी आमची मागणी आहे.

    वर्ष १९४७ ला देशाचे विभाजन झाल्यावर भारतातील अनेक मुसलमान हे त्यांची हजारो एकर भूमी आणि संपत्ती सोडून पाकिस्तानात गेलेत्यांची ही संपत्ती ‘इव्हॅक्यु प्रॉपर्टी ॲक्ट१९५०’ नुसार केंद्र सरकारने स्वत:च्या ताब्यात घ्यायला हवी होतीमात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने ही सर्व संपत्ती वक्फला देऊन त्याचा ‘वक्फ बोर्ड’ बनवला आहेत्यामुळे त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहेखरे तर ती भूमी पाकिस्तानातून स्वत:ची संपत्ती सोडून आलेल्या हिंदूंना देण्याची आवश्यकता होतीमात्र आता ‘वक्फ बोर्ड’ सदर भूमी सरकार आणि खाजगी लोकांना भाडे करारावर देऊन कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेहे चुकीचे आहेसरकारची जागा घेऊन त्याच जागेसाठी सरकारकडून भाडे घेणे हे बेकायदेशीर आहेत्यामुळे हा वक्फ बोर्ड बरखास्त केला पाहिजेअसे अधिवक्ता जैन यांनी सांगितले.

    या वेळी ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्रीजयेश थळी पुढे म्हणाले कीआम्ही मंदिर महासंघाच्या वतीने गोव्यातील मंदिरांच्या जत्रोत्सवात ‘फास्टफूड’ आणि प्लास्टिकच्या बॅगांच्या विरोधात मोहीम चालवली होतीत्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहेआता आम्ही गोव्यातील सर्व मंदिराच्या परिसरातील हिंदू दुकानदारांना ‘ओम सर्टिफिकेट’ चालू करण्याविषयी सांगणार आहोतजेणेकरून येणार्‍या भाविकांना शुद्ध सात्त्विक प्रसाद मिळेल.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.