विश्रामबाग रेल्वे उड्डाणपूलची असून घोटाळा नसून खोळंबा अशी अवस्था : रविंद्र खराडे
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : विद्यानगर, वारणाली परिसर गंगानगर, झेडपी कॉलनी, विद्याविहार कॉलनी, जिजामाता हाऊसिंग सोसायटी या भागातील नागरिकांनी ३० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यानंतर नागरीकांचा त्रास कमी होईल असे वाटत असतानाच, एका नवीन अडचणीने मूळ धरण्यास सुरवात केली. या उड्डाणपूलची लांबी साधारण एक किमी असल्याने, विद्यानगर, वारणाली परिसर गंगानगर, झेडपी कॉलनी, विद्याविहार कॉलनी, जिजामाता हाऊसिंग सोसायटी या परिसरातील लोकांना हा उड्डाणपूल अडचणींचा विषय झाला आहे. लोकांना या पुलाला वळसा घालून जावे लागत असल्याने वेळ व पेट्रोलचा अपव्यय होत आहे. तसेच या पुलाचे दोन्ही बाजूचे वळण हे धोकादायक आहे.
रेल्वे द्रुतगती मार्ग होत असताना मध्य रेल्वेच्या नवीन धोरणानुसार रेल्वे गेट विरहित रेल्वेमार्ग करण्याच्या धोरणानुसार विश्रामबाग गेट क्रं १३० बंद करून, भुयारी मार्ग करण्यात येत आहे. तसेच हा मार्ग केवळ पादचारी असणार आहे असे प्रथमदर्शी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. असे झाले तर शेजारी असणाऱ्या शाळा, महाविद्यालयात, पोलीस स्टेशन, वारणाली पाटबंधारे इत्यादी सरकारी कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होणार आहे. या अडचणी भविष्यात मोठे स्वरूप घेणार हे नक्की त्यासाठी या भागातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत रेल्वे अधिकारी शंभू चौधरी व पीडब्ल्यूडी अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्याशी अडचणींविषयी प्रदीर्घ चर्चा केली. त्यामध्ये माजी आमदार शरद पाटील, विष्णू माने, राजू कुंभार, सोनाली सागरे, शशिकांत गायकवाड , रवी खराडे, प्रदीप साळवी, सचिन लाड , अजित दुधाळ, , सुनील पाटील, रुपसिंग रजपूत, रणजीत तावडे, राम कोळेकर , महेश सागरे, प्रसाद वळकुंडे, अरुण कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, वसंत जाधव आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रशासन व पीडब्ल्यूडी विभाग नागरिकांच्या समस्यांचा विचार करेल असे आश्वासन दिले. तसे न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.